Sunday, October 4, 2009

हरितक्रांतीचे अर्ध्वयू - डॉ. नॉर्मन बोर्लोग

हरितक्रांतीचे अर्ध्वयू डॉ. नॉर्मन बोर्लोग यांचे नुकतेच निधन झाले. हरितक्रांतीनंतर चाळीस वर्षांनी का होईना, पण भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता! (एवढा वेळ हरितक्रांतीला लागला असता तर ?)
लहानगा नॉर्मन दुष्काळग्रस्त नॉर्वेतून आई-वडिलांसोबत अमेरिकेत निर्वासित म्हणून आला आणि त्यापुढील त्याचा प्रवास म्हणजे जागतिक कृषीक्षेत्रातील एक दंतकथाच आहे. १९७० साली हाच नॉर्वेजिअन निर्वासित नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी ओस्लोत हजर होता, हा एक विलक्षण योगायोग.
Dupont या प्रथितयश कंपनीतील नोकरी सोडून डॉ. बोर्लोग १९४४ साली मेक्सिकोत आले आणि पुढील दहा वर्षात अथक परिश्रमाने त्यांनी मेक्सिकोला गहू-उत्पादनात स्वयंपूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. केवळ अमेरिका खंडच नव्हे तर आफ्रिका आणि आशियालाही त्यांच्या मुलभूत संशोधनाचा फायदा झाला. हरितक्रांतीच्या काळात केवळ पाच वर्षात भारताने गहू-उत्पादनात क्रांतिकारक मजल मारली.
आज जगाची लोकसंख्या प्रचंड दराने वाढत असताना डॉ. नॉर्मन बोर्लोग यांचाकडून प्रेरणा घेऊन अधिक संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

No comments:

Post a Comment